पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी

इमेज
  अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी प्रतिनिधि -महेश गडदे, राळेगणसिध्दी .  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. हजारे हे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.   अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली.  भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनाम...

इंदापुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहिर,

इमेज
  इंदापुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहिर , इंदापुर,प्रतिनिधि -महेश गडदे,  झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये इंदापूर तालुक्यातील काही गावांचे आरक्षण बदली झाले , मात्र औरंगाबाद खंडपीठातील निर्णयानुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती व जमातीशी संबंधित आठ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाची सोडत कायम ठेवली . त्यांच्या आरक्षणात कोठेही बदल केला नाही . खुल्या प्रवर्गातील सरपंच. सणसर , शेटफळगडे , तावशी , वडापुरी , चिखली , काटी , निमसाखर , टणू , अकोले , कुरवली , कुंभारगाव , हगारेवाडी , सुरवड , अगोती नंबर १ , जाचकवस्ती , पिंपळे , शहा , पिंपरी खुर्द , गोतोंडी , लोणी देवकर , जाधववाडी , कचरवाडी- ( निमगाव केतकी ) तरंगवाडी , झगडेवाडी , वालचंदनगर , शेटफळ हवेली , वरकुटे खुर्द , तक्रारवाडी , भादलवाडी , भावडी , घोरपडवाडी .    खुल्या गटातील महिला सरपंच. पवारवाडी , गलांडवाडी नंबर 2 , कांदलगाव , डाळज नंबर 1 , बिजवडी , पिंपरी बुद्रुक , कळाशी , भोडणी , बाभूळगाव , डाळज नंबर 2 , शेळगाव , निरवांगी , कालठण नंबर एक , बेलवाडी , न्हावी , निंबोडी , निर निमगाव , काझड , गांजेवळण...

सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार

इमेज
सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार नवी दिल्ली - प्रतिनिधि-महेश गडदे ,   प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुर...

एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ जयंती साजरी।

इमेज
 एल जी बनसुडे विद्यालय पळसदेव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ जयंती साजरी इंदापुर(दि)प्रतिनिधि महेश गडदे, गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल सेमी इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेज पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या विद्यालयांमध्ये 23 जानेवारी 2021 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेला  पुष्पहार  घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्य वंदना बनसुडे उपप्राचार्य दत्तात्रय शिंदे सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक क्लार्क, शिपाई, मावशी  यांच्या उपस्थित जयंती साजरा करण्यात आली तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करून युवकशक्तीला स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रेरणा करणारे व जय हिंद ही राष्ट्रीय घोषणा देणारे भारतीय स्वतंत्र लढ्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती साजरी होत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस  (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले ...

रॅली काढणे” गुलाल उधळणे ‘ पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके उडवल्यास होणार गुन्हा दाखल.

इमेज
  रॅली काढणे” गुलाल उधळणे ‘ पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके उडवल्यास होणार गुन्हा दाखल. इंदापुर द 17 प्रतिनिधि-महेश गडदे. पुणे ग्रामीण जिल्हयात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली आहे. या निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवार दिनांक १८ जानेवारी रोजी होणार असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणी नंतर विजयी गटातील उमेदावर किंवा त्यांचे कार्यकर्ते, समर्थक हे मोठया प्रमाणात एकत्रित येवून ते आपल्या विजयी उमेदवाराची विजय मिरवणुक / रैली काढणे, पराभुत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडणे, विरोधी गटातील कार्यकर्ताच्या अंगावर गुलाल उधळणे, परवानगी शिवाय बॅनर / फ्लेक्स लावणे या घटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टींमुळे दोन गटांमध्ये किंवा दोन जातींमध्ये, धर्मामध्ये सुदधा वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोख...

तक्रारी द्या, सावकारांवर कडक कारवाई करु : IPS अभिनव देशमुख (SP, पुणे ग्रामीण)

इमेज
तक्रारी द्या, सावकारांवर कडक कारवाई करु : IPS अभिनव देशमुख (SP, पुणे ग्रामीण) पुणे,प्रतिनिधि- महेश गडदे, औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरी रोखण्यासाठी दर तिमाहीत उद्योगक्षेत्र आणि पोलिस यांची संयुक्त बैठक सुरू आहेत. टेंडरसाठी दबाव, खंडणीचे प्रकार समोर येत आहेत. उद्योगाचं नुकसान हे समाजाचं नुकसान आहे. त्यामुळे उद्योगांनीही न घाबरता गुंडगिरीच्या तक्रारी कराव्यात असे आवाहन डाॅ. अभिनव देशमुख यांनी केले आहे  सावकारीबद्दल सध्या तक्रारी वाढल्या असल्या तरी त्या नगण्य आहेत. सावकारीची आर्थिक उलाढाल अजस्त्र आहे. सामाजिक प्रतिष्ठेचा बाऊ न करता लोकांनी न घाबरता, मोकळेपणाने सावकारीविरूध्द तक्रारी कराव्यात. लिखापढी नसेल तरीही तक्रारी करा. फोन कॉल्स, मेसेज, साक्षीदार पडताळून कडक कारवाई करू, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे. तसेच पोलिसांसाठी कल्याणकारी योजना राबवत असल्याचेही त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. पुणे जिल्ह्यात सावकारकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. परंतु यापेक्षाही सावकारकीचे जाळे खूप मोठे आहे. महिन्याला पंधरा ते अठरा टक्के व्याज घेणाऱ्या टोळ्या...

राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मतदानाचा हक्क बजावत केले मतदान ,नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन।

इमेज
राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मतदानाचा हक्क बजावत केले मतदान ,नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन।   इंदापुर १५ डिसेंबर//  प्रतिनिधि -महेश गडदे निवडणूक म्हणजे जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देणारा लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही भक्कम करणे गरजेचे आहे सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करत राज्याचे बांधकाम वन राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील आपल्या भरणेवाडी या गावी कुटुंबातील सदस्यांसह गावातील इतर नागरिकांसोबत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला. इंदापूर तालुक्यात ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.६० पैकी ३ ग्रामपंचायत बनविरोध झाल्या असून उर्वरित ५७ ग्रामपंचायतीचे आज दि.१५ रोजी प्रत्यक्षात मतदान होत आहे. ५५६ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात उतरले असून आज मतपेठीत त्यांचे भविष्य बंद होणार आहे. आज सकाळ ७:३० वाजे पासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. इंदापूर तालुक्यात मतदान प्रक्रिया श...

रा.स.प अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्री.बाबिर देवाचे घेतले दर्शन,नागरिकांशी संवाद साधताना केली नाराजी व्यक्त.

इमेज
 रा.स.प अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्री.बाबिर देवाचे घेतले दर्शन,नागरिकांशी संवाद साधताना केली नाराजी व्यक्त. इंदापूर (रुई) प्रतिनिधी- महेश गडदे इंदापूर रुई येथे आज दि.०३/०१/२०२१ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/अध्यक्ष 'महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, माजी कॅबिनेट मंत्री,व विद्यमान आमदार महादेवरावजी जानकर साहेब 'बारामती दौऱ्यावरून रूई ता.इंदापुर जि.पुणे येथे 'महाराष्ट्रा सह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तिर्थक्षेत्र श्री.बाबीर देवाच्या दर्शनासाठी आले होते. रासप चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी श्री बाबीर देवाचे दर्शन घेतले व त्यांनी रुई गावातील काही नागरिकांशी संवाद साधला संवाद साधताना श्री बाबीर देवाच्या विकास कामांवर चर्चा झाली .यावेळी चर्चा दरम्यान माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार महादेव जानकर यांच्या कडे रुई गावातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या . श्री बाबीर देवाच्या समोरील विजेचे दिवे एक वर्षापासून बंद होते ते आत्ता चालु केले,संबंध महाराष्ट्रातुन व देशभरातुन दिपावली भाऊबीजेच्या दिवशी लाखोच्या संख्येत भाविक लोक देवाच्या दर्...

सावित्रीमाई फुले स्री उध्दाराच्या महामेरु; नगरसेविका राजश्री मखरे.

इमेज
  सावित्रीमाई फुले स्री उध्दाराच्या महामेरु; नगरसेविका राजश्री मखरे .   इंदापूर :(दि) प्रतिनिधी-महेश गडदे.  इंदापूर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात आज ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ' शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे, स्रियांचा स्वविश्वास वाढविणे गरजेचे आहे, हे सावित्रीमाईंनी ओळखले आणि काही क्रूर रुढी परंपरांना आळा घातला म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या स्री उध्दाराच्या महामेरु आहेत '  असे प्रतिपादन नगरसेविका राजश्री मखरे यांनी केले.      सुरुवातीला नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती मा.सौ. राजश्री अशोक मखरे यांचे हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हौसाबाई व उषा मखरे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रा. बाळासाहेब मखरे यांनी दिप प्रज्वलन करून गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केली.         पंचशील व ...

पुणे येथे भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.

इमेज
    पुणे येथे भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले. पुणे:प्रतिनिधी-महेश गडदे. पुणे येथे भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतरही सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मांडलेले प्रमुख मुद्दे:  - महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे. सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात. आज या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे. - शेतीवर अवलंबून असलेल्या रोजगाराचा भार आज अधिक आहे. तो सहन करण्याची क्षमता आहे का, याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे सेवाक्षेत्रावर मोठी जबाबदारी येते आहे आणि त्यातून शहरीकरणाचा पसारा वाढतो. अशावेळी वाढत्या शहरीकरणाला चांगल्या सुविधा देणे क्रमप्राप्त ठरते. - सांडपाण्यावर प्रक्रिया यावर आमच्या सरकारच्या काळात मोठा भर देण्यात आला. तो याहीपुढे कायम ठेवला पाहिजे. त्यातून सिंचनाच्या ...