सरपंच अन् ग्रामसेवक गावगाड्यातील विकासरथाची दोन महत्त्वाची चाकं”
सरपंच अन् ग्रामसेवक गावगाड्यातील विकासरथाची दोन महत्त्वाची चाकं” Zee महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे.) “गावाचा विकास हा केवळ योजनांच्या घोषणांमधून होत नाही, तर तो प्रभावी नेतृत्व, सक्षम प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून होत असतो." भारतीय लोकशाहीची खरी ताकद ही खेड्यापाड्यांत दडलेली आहे. देशाच्या विकासाचा पाया हा ग्रामीण भागात असून ग्रामविकासाशिवाय राष्ट्रविकासाची कल्पनाही करता येत नाही. संविधानाच्या ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाल्यानंतर ग्रामपंचायत ही ग्रामीण स्वराज्याची प्रमुख संस्था बनली. या ग्रामपंचायतीच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणून ‘सरपंच आणि ग्रामसेवक’ ही दोन पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. गावगाड्याच्या विकासरथाची ही दोन चाकं आहेत. यापैकी एक चाक लोकप्रतिनिधित्वाचे तर दुसरे प्रशासकीय कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. दोघांमध्ये समन्वय असेल तर गावाचा विकास वेगाने होतो; परंतु समन्वयाचा अभाव असेल तर विकासकामे रखडतात. गावच्या नेतृत्वाचे लोकशाही प्रतीक सरपंच:- सरपंच हा ग्रामपंचायतीचा ...