पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरपंच अन् ग्रामसेवक गावगाड्यातील विकासरथाची दोन महत्त्वाची चाकं”

इमेज
सरपंच अन् ग्रामसेवक गावगाड्यातील विकासरथाची दोन महत्त्वाची चाकं” Zee  महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे.)   “गावाचा विकास हा केवळ योजनांच्या घोषणांमधून होत नाही, तर तो प्रभावी नेतृत्व, सक्षम प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून होत असतो." भारतीय लोकशाहीची खरी ताकद ही खेड्यापाड्यांत दडलेली आहे. देशाच्या विकासाचा पाया हा ग्रामीण भागात असून ग्रामविकासाशिवाय राष्ट्रविकासाची कल्पनाही करता येत नाही. संविधानाच्या ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाल्यानंतर ग्रामपंचायत ही ग्रामीण स्वराज्याची प्रमुख संस्था बनली. या ग्रामपंचायतीच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणून ‘सरपंच आणि ग्रामसेवक’ ही दोन पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. गावगाड्याच्या विकासरथाची ही दोन चाकं आहेत. यापैकी एक चाक लोकप्रतिनिधित्वाचे तर दुसरे प्रशासकीय कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. दोघांमध्ये समन्वय असेल तर गावाचा विकास वेगाने होतो; परंतु समन्वयाचा अभाव असेल तर विकासकामे रखडतात. गावच्या नेतृत्वाचे लोकशाही प्रतीक सरपंच:-            सरपंच हा ग्रामपंचायतीचा ...

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी

इमेज
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रविण भैय्या माने व इतर पदाधिकारी निवेदन देताना. Zee महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे) महावितरण अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन, विहिरी, बोअरवेल तसेच विविध विद्युत पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देणे अशक्य होत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिक...