पोस्ट्स

“निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”

इमेज
“ निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”     Zee महाराष्ट्र न्यूज . (महेश गडदे.) पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जनतेच्या मनात घर करून राहिलेले आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नव्हे; तो ग्रामीण विकासाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा स्मरणदिन आहे. नेतृत्व हे केवळ पदावरून मोजले जात नाही. ते लोकांच्या विश्वासातून आणि कृतीतील सातत्यातून सिद्ध होते.याचा प्रत्यय नानांच्या आजवरच्या वाटचालीतून वारंवार येतो.         बारामती तालुक्यातील निरा-वागज या मातीतून घडलेले नाना पाटील हे त्या भूमीचे संस्कार, कष्ट आणि जिद्दीचे प्रतीक आहेत. शेतकऱ्यांच्या आशा, शेतमजुरांच्या संघर्ष आणि ग्रामीण समाजाच्या स्वप्नांना त्यांनी आपल्या कार्यातून दिशा दिली. म्हणूनच “निरा वागज हे गाव नानाचे गाव” ही भावना घोषवाक्यापुरती मर्यादित राहत नाही तर ती लोकांच्या मनातील श्रद्धा ठरते.         लोकनेते अजित पवार (अजितदादा) यांच्या विश्वासू स...

आता तो रुतबा नाही, तो दरारा नाही…” बारामतीच्या आवाजाची पोकळी - डॉ. प्रकाश पांढरमिसे.

आता तो रुतबा नाही, तो दरारा नाही…” बारामतीच्या आवाजाची पोकळी - डॉ. प्रकाश पांढरमिसे.           Zee  महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे) इंदापूर.ता.०४: “आता तो रुतबा नाही, तो दरारा नाही, तो बारामतीचा आवाज नाही; राजकारणात कित्येक येथील नेते आहेत, पण अजित दादांसारखा दुसरा कोणीही नाही…!”             ही ओळी केवळ एका नेत्याविषयीची भावनिक हाक नाही; ती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीची कबुली आहे. ही पोकळी एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीची नसून, एका राजकीय शैलीच्या, एका ठाम आवाजाच्या आणि एका निर्भीड नेतृत्वाच्या लोपाची आहे. ‘Miss you दादा…’ हे उद्गार जितके वैयक्तिक वाटतात, तितकेच ते सार्वजनिक मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात.               अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सत्तास्थानाशी जोडलेले नव्हते; ते निर्णयक्षमता, प्रशासकीय पकड आणि स्पष्टतेचे प्रतीक होते. बारामतीचा आवाज हा भौगोलिक नव्हता. तो राज्यव्यवस्थेच्या केंद्रापर्यंत पोहोचणारा, अनेकदा अस्वस्थ करणारा; पण दुर्लक्षित करता ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे प्रेरणादायी कार्य – डॉ. प्रकाश पांढरमिसे.

इमेज
“ न्याय, नीतिमत्ता आणि लोककल्याणाचा आदर्श राजधर्म” : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे प्रेरणादायी कार्य – डॉ. प्रकाश पांढरमिसे.               Zee महाराष्ट्र न्यूज.(महेश गडदे) इंदापूर.ता.०३: राजसत्ता ही वैभवासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी असते, हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य भारतीय इतिहासातील एक तेजस्वी पर्व असल्याचे प्रतिपादन टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त) खडकी येथील इतिहास विभागप्रमुख, ऐतिहासिक व सामाजिक अभ्यासक, व्याख्याते डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध – पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.         कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपप्रचार्य डॉ. संदीप ननावरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेतला. “इतिहासातील स्त्री सत्ताधीश म्हणून अहिल्यादेवी होळकर या केवळ प्रशासक नव्हत...

अजितदादांकडून सहकार चळवळीला मोठी मदत-हर्षवर्धन पाटील.

इमेज
___________________________ शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा कारखान्यावरती श्रद्धांजली सभेत बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. • नीरा भीमा कारखान्यावरती श्रद्धांजली सभा  इंदापूर.दि.०२: राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी अजितदादांची भूमिका होती. त्याचबरोबर अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार चळवळीला कायम सहकार्य केले. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यामुळे सहकार चळवळीचे नुकसान झाल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 2) व्यक्त केले.         शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणेसाठी आयोजित शोकसभेत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले,अजितदादा यांना राज्यातील सर्वच विषयांचा अभ्यास होता. त्यांनी राज्यातील कृषी-प्रक्रिया उद्योगाच्या बळकटीकरणासाठी सातत्याने काम केले. साखर उद्योगाला सहकार्य करण्याची त्यांची सातत्याने भूमिका होती. समाजातील सर्व...

प्रा.डॉ.संजय चाकणे,भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे दिशादर्शक प्रशासक -डॉ.प्रकाश पांढरमिसे

इमेज
प्रा. डॉ. संजय चाकणे भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे दिशादर्शक प्रशासक - डॉ.प्रकाश पांढरमिसे. Zee  महाराष्ट्र न्यूज..( श्री.महेश गडदे. )            इंदापूर.ता.०१: भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेला आज जेव्हा गुणवत्तेची, नवोन्मेषाची आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाची नितांत गरज आहे, तेव्हा काही व्यक्तिमत्त्वे केवळ प्रशासक म्हणून नव्हे, तर दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून समोर येतात. त्यापैकी प्राचार्य डॉ. संजय चाकणे हे असेच एक नाव आहे, ज्यांनी गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करताना अध्यापन, संशोधन, प्रशासन आणि समाजभान यांचा समन्वय साधत उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली आहे.               डॉ. संजय चाकणे यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून येत शहरी शैक्षणिक विश्वात स्वतःची ठाम ओळख निर्माण केली आहे त्यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी प्रेरणा देणारा आहे. गेली ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अभ्यासू नेतृत्वाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल सात वर्षे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ...

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा

इमेज
माजी विद्यार्थी मेळाव्याला इ.आठवी ते दहावी च्या मुला मुलींनी लावली हजेरी.    Zee महाराष्ट्र न्यूज.✍️ महेश गडदे. इंदापूर .ता.२७: मेळाव्याची सुरवात श्री सरस्वती व स्व.आत्माराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पूजन मुखद्यापक श्री.जगन्नाथ पाटील सर व .श्री.आमरसिह पाटील आणि सर्व शिक्षक श्री सुनील दराडे, श्री धनाजी गावडे, श्री दादा निटवे श्री उस्मान मुलाणी श्री.बी बी मुलाणी, श्री आमिन मुल्ला श्री सोनवले सर श्री काळे सर श्री जाधवसर श्रीमती मिरादेवी यांच्या हस्ते झाले. सूत्र संचालन श्री अतुल बनसोडे यांनी केले.सर्व शिक्षक व मुले व मुलींचे स्वागत श्री सोमनाथ सनवले यांनी स्वतःलिहलेल्या श्री स्वामी समर्थ यांचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. मेळाव्या दरम्यान मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ पाटील यांनी माझी विद्यार्धी यांना मार्गदर्शन केले.ते म्हणलेकी, शिक्षण हे चगल्या प्रकारे स्वीकारले पाहिजे त्याचा उपयोग हा रोजच्या जीवनात झाला पाहिजे शिक्षण हे वागिनीचे दूध आहे ते जर पिले तर ते नखीच बळ दिल्याशिवाय राहणार नाही.ते आपल्या नव्या पिढीची प्रगतीच होणार. आता आम्ही ठरव...

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

इमेज
'इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड. भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका पश्चिम मंडलाचे महामंत्री तानाजी मारकड शेळगाव पंचायत समिती गणातून इच्छुक आहेत काल उमेदवारीसाठी त्यांनी मुलाखत दिली, पक्षाच्या वरिष्ठांनी फॉर्म भरण्याची संकेत त्यांना दिलेले आहेत. तानाजी मारकड गेली १२ वर्षांपासून वयाच्या २१ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत,राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ते चळवळीत राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय होते, इंदापूर तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा महत्त्वाच्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे ते संस्थापक/अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला 'भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाचे 'राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार व अनेक वेगवेगळे सन्मान कार्याच्या जोरावर प्राप्त झालेले आहे, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य शिक्षण अशा क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान आहे,  त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. 'देशाच्या '...