इंदापूर तालुक्यातील् जनतेच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी माळी सेवा संघ इंदापूर तालुका आक्रमक.

 इंदापूर तालुक्यातील् जनतेच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी माळी सेवा संघ इंदापूर तालुका आक्रमक.


इंदापुर, प्रतिनिधि-महेश गडदे,
  माळी सेवा संघ इंदापूर तालुका व् शहर पदाधिकारी यांनी आज मा तहसीलदार इंदापूर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.


 इंदापूर तालुका मधील २२ गावा साठी महाराष्ट्र शासन यांनी मंजूर केलेले ५ टीमसी पाणी हे जनते च्या हक्कचे आहे मुळातच् इंदापूर तालुका मध्ये उजनी धारणाचे मोठ्या प्रमाणात पाण लोट क्षेत्र आहे


 उजनी धरना साठी इंदापूर तालुका मधील अनेक गावे आणि शेतकरी व् जनता यांनी योगदान दिलेले आहे. सदर पाण्या वरती इंदापूर जनतेचा नैसर्गिक हक्क व् अधिकार प्राप्त झालेला आहे हा पाणी प्रश्न अनेक दशाका पासून प्रलंबित होता म्हणून २२ गावातील शेतकरी, 



जनता आणि गावे वंचित राहिलेली आहेत म्हणून च् इंदापूर चे लोक प्रतिनिधी मा ना दत्तात्रय भरणे मामा यांनी या विषया चा पाठ पुरावा करून ५ टीम सी पाणी इंदापूर कर यांच्या हक्कांचे मंजूर करून घेतले. 
नंतर पाणी मंजूरी चा आदेश रद्द करण्यात आला म्हणून माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका पदाधिकारी व् तालुक्यातील जनेते च्या वतीने शासना कडे मागणी करीत आहोत कि तात्काळ ५ टीम टीम सी हक्कांचे पाणी शेती साठी पिण्या साठी मंजूर करून त्याची अम्बल् बजावणी करण्यात यावी अन्यथा माळी सेवा संघ इंदापूर तालुका पदाधिकारी व् जनतेच्या वतीने तीव्र स्वरुपचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 


         निवेदन देते वेळी माळी सेवा संघाचे राज्य संघटक श्री ज्ञानदेव शिंदे कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य adv श्री नितीन राजगुरू, तालुका अध्यक्ष श्री बापूसाहेब बोराटे, तालुका महिला अध्यक्ष सौ वर्षा ताई भोंग, तालुका कार्यकारिणी सदस्य चि. अक्षय माळी, श्री बाळासाहेब झगडे, इंदापूर शहर अध्यक्ष श्री सुहास बोराटे, चि.संतोष(मामा) जाधव आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.