इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न वरदान की शाप ? विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी:हामा पाटील.
इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न वरदान की शाप ? विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी:हामा पाटील.
हामा पाटील:अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका.प्रतिनिधी महेश गडदे,
इंदापुर च्या शेती सिंचनासाठी उजणीतुन पाच टिएमसी पाणी उचलण्यास राज्यशासनाची मान्यता मिळाली हे तालुक्यासाठी वरदान की शाप यावर तालुक्यातील प्रमुख विरोधकांनी आपली भुमिका स्पष्ट करावी आसे हामा पाटील ,अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर
इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिंचन व निरा डाव्या कालव्यावरील बावीस गावातील शेतीसाठी उजनी जलाशयातुन पाच टिएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे.
हा खुप वर्षांचा प्रलंबित प्रश्न होता व तालुक्यासाठी ऐतिहासिक निर्णय असलेमुळे शेतीला चांगले दिवस येणार आहेत सदर योजनेमुळे तालुक्यातील दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे .
तालुक्यातील शेतकऱ्यांनी या बाबत पेढे वाढुन आनंद व्येक्त केला आहे सदर पाणी वाटप हे सोलापूर जिल्याच्या पाणी वाटप कोठ्यातील एक थेंब ही पाण्याला ला हात न लावता पुण्यातुन मुळा मुढा व्दारे उजनीत येणाय्रा सांडपाणी मधुन पाणी उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे.
परंतु यावर सोलापूर जिल्यातील शेतकय्रा मध्ये चुकिचा गैरसमज व चुकीच्या बातम्या इंदापुर तालुक्यातील प्रमुख विरोधक हि योजना मामांनी मंजुर करून आणली म्हणुन या योजनेला बाहेरून छुपा विरोध करण्यासाठी व राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर मा.दत्तात्रय भरणे यांना सोलापूर मधुन त्रास देणे साठी पसरवत आहेत.
आशी इंदापूर तालुक्यातील जनतेमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे तसेच तालुक्यातील जनतेमधुन अशी मागणी होत आहे कि तालुक्यात उजनीतुन येणारे पाणी हे तालुक्यातील दोन्ही बाजुच्या शेतकय्रांनसाठी फायदेचे कि तोट्याचे यावर तालुक्यातील प्रमुख विरोधकांनी आपली स्पष्ट भुमीका मांडांवी म्हणजे जनतेच्या मनातील गैरसमज दुर होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा