पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२३ एकर जागा, इमारतीच्या वर हेलिपॅड , वर्षअखेरीस बारामतीत होणार 500 बेड्सचे शासकीय रुग्णालय ,

इमेज
  २३ एकर जागा, इमारतीच्या वर हेलिपॅड , वर्षअखेरीस बारामतीत होणार 500 बेड्सचे शासकीय रुग्णालय , अजितदादांकडून प्रत्येक बाबींवर लक्ष , प्रतिनिधी -महेश गडदे, बारामती : येथे होणारे शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालय या वर्षअखेरीपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदाचे दुसरे वर्ष असून त्याला संलग्न 500 बेडसचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार उभारलेले सर्वोपचार रुग्णालय वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग युध्दपातळीवर काम करत असून कोविडच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला आहे. बारामती एमआयडीसीतील 23 एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, होस्टेल व निवासस्थाने असा भव्य प्रकल्प साकारला आहे. संपूर्ण इमारतींचे क्षेत्रफळ बारा लाख स्क्वेअर फूटांचे आहे. या प्रकल्पात बारा इमारती उभारलेल्या असून सर्वोपचार रुग्णालयाची इमारत सात मजली तर वैदयकीय महाविद्यालयाची इमारत पाच मजली आहे. वसतिगृहाच्या पाच इमारती असून विद्यार्थी व विद्यार्थीनीं...

इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न वरदान की शाप ? विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी:हामा पाटील.

इमेज
  इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न वरदान की शाप ? विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी:हामा पाटील. हामा पाटील:अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका. प्रतिनिधी महेश गडदे, इंदापुर च्या शेती सिंचनासाठी उजणीतुन पाच टिएमसी पाणी उचलण्यास राज्यशासनाची मान्यता मिळाली हे तालुक्यासाठी वरदान की शाप यावर तालुक्यातील प्रमुख विरोधकांनी आपली भुमिका स्पष्ट करावी आसे हामा पाटील ,अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिंचन व निरा डाव्या कालव्यावरील बावीस गावातील शेतीसाठी उजनी जलाशयातुन पाच टिएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे.  हा खुप वर्षांचा प्रलंबित प्रश्न होता व तालुक्यासाठी ऐतिहासिक निर्णय असलेमुळे शेतीला चांगले दिवस येणार आहेत सदर योजनेमुळे तालुक्यातील दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे . तालुक्यातील शेतकऱ्यांनी या बाबत पेढे वाढुन आनंद व्येक्त केला आहे सदर पाणी वाटप हे सोलापूर जिल्याच्या पाणी वाटप कोठ्यातील एक थेंब ही पाण्याला ...

इंदापुर महादेव नगर येथे विवाह सोहळ्यामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन,

इमेज
  इंदापुर महादेव नगर येथे विवाह सोहळ्यामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन , प्रतिनिधि- महेश गडदे. इंदापुर, आज शहा महादेव नगर येथे इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षा चे अध्यक्ष मा सतीश दादा शिंगाडे यांचे भाचे श्रीकृष्ण देवकाते यांचा तेजश्री सुळ यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला.  या सोहळ्या मध्ये अनावश्यक खर्च टाळून covid 19 च्या काळात जाणवत असलेल्या रक्ताचा तुटवडा या मुळे रक्तदान शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे.  या वेळी इंदापूर तालुका रासप अध्यक्ष सतीश दादा शिंगाडे यांनी रक्तदान केले . तसेच या ठिकाणी मोठया प्रमाणात युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या उपक्रमाचे कौतूक या परिसरात होत आहे.  तसेच covid 19 च्या काळात रक्ताचा तुटवडा जाणव त आहे तरी लग्न सोहळा व इतर कार्यक्रमातील अनावश्यक खर्च टाळून ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान शिबीराच आयोजन करून रक्तदान करावे असे आव्हान इंदापूर तालुका रासप अध्यक्ष सतीश दादा शिंगाडे यांनी केले.

इंदापुर:वालचंदनगर पोलीसांची दमदार कामगिरी

इमेज
  वालचंदनगर पोलीसांची दमदार कामगिरी ! १० धारदार शस्त्रासह आरोपीला केली अटक,   इंदापूर प्रतिनिधी : -महेश गडदे,   इंदापूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून अशाच एका गुन्हेगारावरती वालचंदनगर पोलीसांच्या वतीने २७ एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली. वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वालचंदनगर येथून एक जण दुचाकीवरून दहा घातक हत्यारे निघाला असल्याची बातमी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार वालचंदनगर रोडवर एक संशयित दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवर काहीतरी पार्सल घेवुन येत असल्याचे दिसल्याने त्यास तात्काळ अडवून त्याचेकडील पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये १० धारदार शस्त्रे मिळुन आली आहेत सदर इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सचिन गंधारे रा . शेळगाव ता . इंदापूर असे त्याचे नांव आहे. सदर आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेवुन त्याला अटक केली असून त्याचेवर वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये शस्त्र अधिनियम या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख, अपर पोल...

राज्य सरकारची कोरोना साखळी तोडण्यासाठी लादलेल्या निर्बंधाच्या काळात मोठी घोषणा, ५हजार ४७६ कोटीचे महाराष्ट्राला मदत पॅकेज,

इमेज
  राज्य सरकारची कोरोना साखळी तोडण्यासाठी लादलेल्या निर्बंधाच्या काळात मोठी घोषणा, ५हजार ४७६ कोटीचे महाराष्ट्राला मदत पॅकेज, प्रतिनिधि- महेश गडदे, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधांच्या काळात नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटी रुपये मदत पॅकेजची अंमलबजावणी व निधी उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीचा आढावा आयोजित बैठकीत घेतला,  याअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. यासाठी ९० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.  निर्बंध काळात राज्यभर दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्या मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी ७५ कोटी रुपये उपलब्ध केले जातील.  संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांतील ३५ लाख लाभार्थ्याना २ महिन्यासाठी प्रत्येकी १ हजार रु. आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यासाठी ९६१ कोटी देणार.  राज्यातील १२ लाख नोंदणीकृत बांधकाम काम...

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर कडक निर्बंध लावावेच लागतील.मुख्यमंत्री,

इमेज
मुख्यमंत्री उद्धव  बाळासाहेब ठाकरे, प्रमुख पक्षांचे नेते व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी मांडले मुद्दे,   प्रतिनिधि- महेश गडदे, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत रेमेडीसिवीर उपलब्धता,चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे,ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा सूचनांवर शासन कार्यवाही करेल आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता सर्व खुले झाले आहे त्यामुळे यात व्यावहारिक अडचणी येतात हे केंद्राने समजून घ्यावे. लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे युवा पिढीला लस ...